आजच्या सातत्याने बदलणाऱ्या आर्थिक जगात, नोकरी हि व्यवसायापेक्षाही अनिश्चित झाली आहे. तुम्हाला केव्हा नोकरीचा राजीनामा द्यायला सांगतील याची शाश्वती नाही. बर्याचदा अगदी नोकरी सोढावी नाही लागली तरी नोकरीत काही अशी कामे करायला भाग पाडले जाते जे करण्याची तुमची इच्छा नसते अथवा मानसिकताही नसते. अशावेळेस स्वप्नातला जॉब मिळावा अशी अशा करणे म्हणजे मृगजळामागे धावण्यासारखेच आहे. आपल्या पैकी अनेकांना ह्या सत्याची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच अनेक तरुण नोकरीचा विचार सोडुन उद्योग्धन्द्याला प्राधान्य देताना दिसतात.
वरवर पाहता स्वमालाकीचा उद्योग हा फायदेशीर आणि अधिक फलदायी वाटतो खरा पण याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही जे काही कराल त्या सगळ्यात यशस्वीच व्हाल. सर्वसामान्य माणसाप्रमाणे तुम्हीही छोट्या मोठ्या चुका जरूर कराल आणि या चुकांचं भुर्दंड हि तुम्हाला भरावा लागेल. अगदी चुकाप्रूफ उद्योग करता येणार नसला तरी अनुभवी उद्योजकांकडून शिकून अनेक चुका टाळता येण्यासारख्या नक्कीच आहेत. अशी लोकं ज्यांनी परिश्रमातून, प्रयत्नातून, चुका करून आणि त्या सुधारून उद्योग यशस्वीरीत्या उभे केलेत अशा लोकांचे अनुभव नवीन उद्योजकांना नक्कीच मार्गदर्शक ठरतात.
सामान्यतः पुढील सात चुका बहुतेक नवीन उद्योजक करतात. पहा या चुकांबद्दल वाचताना डोक्यात घंटी वाजते का. सर्वात महत्वाच म्हणजे या चुका कशा टाळता येतील ते शिकून घ्या आणि उद्योजक म्हणून यशस्वी हेण्याचे तुमचे चान्सेस वाढवा.
१) सुस्पष्ट ध्येय आणि उद्दिष्ट नसणे.
उद्योजक म्हणून सर्वात मोठी घोडचूक जर काही असेल तर सुनिश्चित ध्येय नसणे. रिसर्च असा सांगते की अनेक उद्योजक परिणामांचा विचार न करता उद्योगात उतरतात. त्यांना काय सध्या करायचे हे तर माहित नसतेच परिणामी कसे सध्या कार्याचे हे हि काळात नसते. नवोदित उद्योजक म्हणून तुम्हाला हे माहित असणे फार गरजेच आहे की तुमच्या उद्योगाचे यश हे तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर मोठ्याप्रमाणावर अवलंबून असते. सुरुवातीपासूनच तुमच्या उद्योगाने तुम्हाला काय सध्या करून दिला पाहिजे याचा आराखडा तुमच्या कडे असणे गरजेचे आहे. हा आराखडा तुमच्या डोक्यात असून चालणार नाही तो कागदावर तपशीलवार मांडला पहिजे. जर तुम्हाला तुमच्या शहरातील सर्वात मोट्टी restaurant chain उभी करायची असेल तर बसून वेळ वय घालवून चालणार नाही. कामाला लागावं लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करून प्रथम तपशीलवार आराखडा मांडण्यासाठी लागणारी माहिती गोळा करावी लगेल. उद्योगाचा आराखडा मांडण्य साठी पुढील काही महत्वाच्या बाबींचा समावेश करणे गरजेच आहे.
o अल्पावधी आणि दीर्घावधी ध्येयo तुमचं उत्पाद किंवा सेवाo ग्राहक वर्गo उत्पाद ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृतीची सूचीo कामगारांच्या जबाबदाऱ्यांचा गोषवारा Summary
२) आर्थिक नियोजनाकडे दुर्लक्ष
मराठीत म्हण आहे ” सगळ्या गोष्टींच ढोंग करता येत पण पैशाच ढोंग करता येत नाही ” उद्योगासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळ उपलब्धता करण्यात जर अपयश आलं तर एक गोष्ट नक्की की तुमचा उद्योग टेक ऑफ करणारच नाही. तुमच्या उद्योगाच्या भरभरासाठी भांडवल उभे करणे तितकेच महत्वाचे आहे जितके जगण्या साठी oxygen.
उद्योग सुरु करण्या आधीच आर्थिक पाठबळ कुठून मिळेल याची तरतूद करणे गरजेचे आहे. तुमच्या स्वतःकडे जर भांडवल नसेल तर financial पार्टनर शोधा. मित्रपरिवाराकडून मदत होते का ते पहा , पण भांडवलाच्या अभावात उद्योग सुरु करू नका. आपण भांडवला शिवाय व्यवसाय सुरु करून अतिशय यशस्वी झाल्याच्या प्रेरणा देणाऱ्या कथा ऐकतो. त्या एकतर खोट्या असतात किंवा तुम्हाला अर्धवटच सांगितल्या जातात. फक्त प्रेरणादायी कथांच्या आहारी जाऊ नका. भांडवलाच्या तरतुदीच्या मागे लागा. सुरवातीला तुम्हाला बँका अथवा financial institution भांडवल देणार नहित. एखादा angel गुंतवणूकदार पहा. अतिशय जास्त व्याजावर पैसे घेण्याऐवजी भाग भांडवलाच्या आधारावर पैसे उभे करता येतात का ते पहा. एकदा का भांडवलाची तयारी झाली की मग प्रत्येक खर्चाचे व्यवस्तीत नियोजन करा. इतर बेजवाबदार तरुणांप्रमाणे पैशाचा अपव्यय टाळा. महागडे चष्मे, मोटार गाड्या आणि मैत्रिणींवर व्यवसायातला पैसा उधळू नका (अनुभवाचे बोल).तुम्ही व्यवसायात नवीन असल्यामुळे तुम्हाला आधीच मोठ्या रकमा कशा हाताळायच्या हे माहित नसते त्यामुळे अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या. तुमचा उद्योग असला तरी पैसा उद्योगाचा आहे. अगदी सुरवाती पासूनच स्वतःला पगार द्या. वेळ पडली की गल्ल्यात हात घालण्याची घाणेरडी सवय टाळा. तुमचा आणि उद्योगाचा पैसा वेगळा आहे हे सत्य नेहमी लक्षात असुद्या मग पहा उद्योग कसा आपोआप तुमची आर्थिक भरभराट करतो ती.
३) सुपरमॅन असल्यासारखे वागणे.
हे खरं आहे की बहुतेक नवोदित उद्योजक सर्व कामं स्वतःच कुणाची मदत न घेता करण्याचा प्रयत्न करतात. हे कोणत्याही उद्योगासाठी घातक ठरू शकते. एक sustainable उद्योग उभा करणे हे खूप मोठ्ठे आव्हान आहे आणि हे एका माणसाचे काम नाही हे लक्षातअसु द्या. त्यामुळे सर्वकाही स्वतः करण्याचे टाळा आणि तज्ञांची मदत घ्या.
स्वतःभोवती अनुभवी लोकांचे वर्तुळ निर्माण करा. कधीही मदत मागण्याची भीती व संकोच ठेवू नका. समविचारी लोकांबरोबर काम करण्याच्या संध्या शोधा किंवा निर्माण करा. जरी अनेकांकडून मदत आणि सल्ला मागत असलात तरी आंधळेपणाने कोणताही सल्ला पाळू नाका. मिळालेल्या सल्यावर विचार करा आणि मगच त्याचे अनुकरण करा. दुर्दैवाने उद्योग जगतात इर्षा, चढाओढ अशा गोष्टींचाही समावेश आहे त्यामुळे सदैव सतर्क रहाणेही गरजेच आहे.
४) अति लोभ
उद्योग सुरु करण्यामागे खूप पैसे कमावून श्रीमंत होणे हा एकमेव हेतू असेल तर अपयशी होणे कधीच टाळता येणार नाही. उद्योगात अति लोभी हेणे हि सर्वात मोठी घोडचूक ठरू शकते. लोभ तुमचा उद्योग उभा करण्या ऐवजी तुम्हाला उध्वस्त करू शकतो. फक्त उद्योगातून कीती पैसे उभे करायचे याच्यावर लक्ष केंद्रित करण्या ऐवजी ग्राहकाला सर्वोत्तम सेवा कशी देता येयील , सहकाऱ्यांना कसे प्रेरित करता येईल, चांगले सहकारी कसे जोडता येतील, चांगल्या गुंतवणुका कशा करता येतील यावर लक्ष केंद्रित केले तर अपेक्षित श्रीमंती अनुषंगाने तुमच्याकडे आकर्षित होईल. तात्पर्य तुमचा व्यवसाय तुम्हाला सध्यपारीस्थितीत जे उत्पन्न देतोय त्यात समाधान मान आणि अति लोभ टाळा.
५) स्वतःच्या चुका न स्वीकारणे.
चुका करणे एक बाब तर त्या स्वीकारणे आणि सुधारणे दुसरी. मी चुकलो हे मान्य केल्याशिवाय त्या सुधारणे कधीच शक्य नाही. बहुतेक उद्योजक स्वतःच्या चुका मान्य करणे टाळतात. त्यांचा हा ठाम विश्वास असतो की त्यांची मतप्रणाली, योजना आणि कार्यपद्धती सर्वोत्तम आहे आणि त्यावर कोणी बोट उचलता कामा नये. एखाद्या महत्वाच्या सल्ल्याकडे किंवा कल्पनेकडे या मुळे दुर्लक्ष केलं जातं आणि अपेक्षित सुधारणा आणि प्रगती होत नाही. अनेकदा स्वतःच्या चुकांचे खापर परिस्थितीवर अथवा इतर लोकांवर फोडले जाते , एकदा चुकांची जवाबदारी परिस्थितीवर टाकली की स्वताला प्रश्न विचारायची गरज राहत नाही, पर्यायाने सिंहावलोकन (introspection) होत नाही.
६) उतावळेपणा
आकडेवारी प्रमाणे दरवर्षी ६०% उद्योग उतावळ्या उद्योजाकांमुळे बंद पडतात. उद्योग सुरु झाल्या झाल्या मोठ्या परिणामाची अपेक्षा उद्योगापासून ठेवली जाते. उतावळेपणा हा अतिशय घातक आजार आहे, जो उद्योगाला बाळसं धरण्याआधी आक्रमण करून संपवून टाकतो. नवोदित उद्योजक म्हणून तुम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की उद्योग रातोरात उभा राहत नाही. उद्योगात काही तत्व लक्षात घेणं गरजेच आहे “measurable progress in Reasonable Time “. शेतकर्याप्रमाणे पेरल्यावर उगवण्याची वाट पहावी लागते. दरम्यानच्या काळात निगा राखावी लागते. तुम्ही कीतीही ओरडलात “उगव , उगव ” तरी उगवायला जितका वेळ लागणार तितका लागणारच. उतावळेपणाने गरजेपेक्षा अधिक खात आणि केमिकल वापरलं तर sustainability कधीच साध्य होणार नाही.
७) ब्रांड न बनविणे
अनेक नवोदित उद्योजक काम पूर्ण करण्यावर जास्त भर देतात आणि स्वतःच्या उद्योगाची एक स्पष्ट ओळख निर्माण करण्याचे विसरतात. तुम्ही उद्योग सुरु केल्या केल्या बरीच लोकं तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे उद्योगाची ओळख निर्माण करणे गरजेचे आहे परिणामी तुमचे संभावित ग्राहकांना स्पष्टपणे कळेल की तुमच्याकडून काय अपेक्ष ठेवायच्या. एक चांगला ब्रांड फक्त तुमची विश्वसनीयता वाढवत नाही तर तुमच्या उद्योगाची तत्वप्रणाली ग्राहकांपर्यंत पोहोचवतो ज्यामुळे तुम्ही ग्राहकाच्या लक्षात तर राहातच पण ग्राहक देखील तुमच्याशी व्यवहार करायला प्रेरित होतो.
उद्योजक मित्रांनो मी अनुभवलेल्या काही गोष्टी या लेखाद्वारे आपणा पर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न. यातील सर्वच तुम्हाला पटेल असा आग्रह नाही. पण जे पटेल ते उद्योगात वापरा. हे उद्योगरूपी विश्वविद्यालय तुम्हाला जगण्याचा खरा आनंद देईल .
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti