तुमच्या एखाद्या चांगल्या कामाबद्दल देव तुमच्यावर प्रसन्न झाला आणि वरदान दिले. तर तुम्ही काय मागाल? पैसा, घर, गाडी, प्रसिद्धी. तेही स्वतःसाठी. दुसऱ्यासाठी काहीच नाही मागणार. आपण दुसऱ्याचा कधी विचार करणार? या जगात दुसऱ्याचा विचार करणारी माणसंच खूप मोठी झाली आहेत. माणसं मोठी होतात, ती छोट्या छोट्या लोकांचा विचार करूनच.. एक छोटासा दुसऱ्याचा विचार, एका मराठी माणसाला इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतो की, त्या माणसाचा साऱ्यांनाच हेवा वाटतो. अशाच एका यशस्वी उद्योजकाचा, जो स्वतःला एक समाजसेवक मानतो. त्या समाजसेवकाचा हा प्रेरणादायी प्रवास….
त्याचा जन्म साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर गावी झाला.. वडील सातारच्या न्यायालयात कारकून आणि आई गृहिणी.
अभ्यासात प्रचंड हुशार. पैकीच्या पैकी गुण मिळविणारा. एका १०×१० च्या भाड्याच्या खोलीत चारजणांचे कुटुंब राहायचे. घरात लाईट सुद्धा नव्हती. वडील सतत आजारी असायचे. पैशांची गरज लागली की पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं गहाण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.
घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीने लहानपणी त्याची हौसमौज झालीच नाही. याउलट, अगदी रेल्वे स्टेशनवर आंबे विकण्यापासून ते अनेक कामं करावी लागली.
अशा बिकट परिस्थितीतही त्याने आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर दहावीत ८८% गुण मिळविले व गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. संकटांनी अजूनही पाठलाग सोडला नव्हता. त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि कुटुंबावर मोठे संकट कोसळले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आता हा जीवतोड मेहनत करू लागला.
डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर बी-टेकसाठी पुण्यात एका घराजवळच्या कॉलेजात प्रवेश मागितला, तेथे त्याला एक लाख रुपये डोनेशन मागितलं गेलं. म्हणून त्याने २२ किमी लांब असणाऱ्या व्हीआयटी कॉलेजात प्रवेश घेतला. दररोज ४२ कि.मी. सायकलवरून प्रवास करावा लागायचा. कारण होस्टेलचं भाडं द्यायची ऐपत नव्हती. पण याने कधीही कंटाळा केला नाही. कारण, त्याला आपली परिस्थिती बदलायची होती. यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. याची त्याला जाणीव होती.
आईला आर्थिक मदत म्हणून पुढे शिकवणी घ्यायला सुरुवात केली. सॉस, जामची विक्री केली. रंगकाम मजूर म्हणून आणि ठेकेदार म्हणून सुद्धा काम केले. या सर्व कामांनी भविष्यातील यशस्वी उद्योजकाची पायाभरणी केली.
इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर टेल्कोमध्ये ७ हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. आपला उद्धार करण्यासाठी प्रत्येकाला एखादी संधी मिळतेच. ती संधी यालाही टेल्कोत मिळाली. त्याने कंपनीच्या गोदामात वर्षांपासून पडून असलेल्या केबल वायरचा पुनर्वापर करायच्या पद्धती हुडकून काढली. केबलचा पुनर्वापर केला गेल्यामुळे टेल्को कंपनीला कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला. या कामावर खुश होऊन बॉसनी बक्षीस मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने स्वतःसाठी काही न मागता, नोकरीच्या आशेने त्याच्याकडे आलेल्या गावातील काही तरुणांसाठी कंपनीत काम मागितले. तेव्हा साहेबांनी त्याला एक संस्था स्थापण्याचा सल्ला दिला आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गावाकडच्या या तरुणांना नोकरी देण्याचे सुचविले. त्याने वेळ न दवडता ‘भारत विकास प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली आणि गावाकडच्या ८ तरुणांना नोकरी मिळवून दिली.
सेवाभावी वृत्तीने सुरू केलेल्या या कंपनीने त्याला यशाचा मार्ग मोकळा करून दिला. पहिले कंत्राट मिळाले. पहिल्या वर्षी ८ लाख, दुसऱ्या वर्षी ३० लाख आणि तिसऱ्या वर्षी ६० लाखांचा नफा झाला. या यशाने त्याने नोकरीला रामराम केला आणि खऱ्या अर्थाने एक समाजसेवक आणि मोठा उद्योजक होण्यास तो सज्ज झाला.
कंपनीचे ‘भारत विकास सर्विसेस’ असे नामकरण केले. या संस्थेने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांना आणि संस्थाना विविध सेवा पुरवण्याचे काम सुरु केले. गरजेनुसार साफ-सफाई करणाऱ्या अद्ययावत मशीनरीज् खरेदी केल्या. यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत गेला.
वर्ष २००४ साली ‘भारत विकास सर्विसेस’ला भारतीय संसद भवनाच्या साफसफाईचे काम मिळाले. पुढे पंतप्रधान कार्यालयाचे कामही या संस्थेला मिळाले. त्यांच्या संस्थेच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत गेला. देशातल्या मोठमोठ्या संस्थांची कामं मिळाली. सरकारी भवन, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानक, एअरपोर्ट, कॉर्पोरेट भवन, मंदिरं यासारख्या अनेक ठिकाणच्या कामाची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभे करण्यात आले आणि त्याला ‘भारत विकास ग्रुप’ म्हणजेच ‘BVG ग्रुप’ असे नाव देण्यात आले. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (१०८ क्रमांक) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. हे सर्व निर्माण करणारा आणि तो सेवाभावी व्यक्ती आणि उद्योजक म्हणजे श्री. हणमंतराव गायकवाड.
हणमंतरावांना टेल्कोतील बक्षीस मागण्याच्या वेळी स्वतःसाठी घर, गाडी, प्रमोशन, पगारवाढ यापैकी काहीही मागता आले असते आणि त्यांना ते सहज मिळालेही असते. पण, ते घेऊन ते आज ते कुठपर्यंत पोहोचले असते? हणमंतराव गायकवाड हे नाव कुणाला माहितही झाले नसते. ते लोकांचा विचार करत गेले आणि मोठे होत गेले.
एकेकाळी आंबे विकणाऱ्या, शिकवणी घेणाऱ्या, रंगकाम करणाऱ्या हणमंतरावांच्या हाताखाली आज ‘BVG’मध्ये ८०००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
✍️ लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️‘यशवंत – एक प्रेरणास्त्रोत’ ही लेखमालिका इथेच थांबवत आहोत. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद…
धन्यवाद या माहितीबद्दल. खूप छान.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti