शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या एका अडाणी, अशिक्षित “अक्षर संता”चा हा प्रेरणादायी प्रवास
कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्हापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या नवापडापू या छोट्याशा आणि अतिमागास खेड्यात १९५२/५३ साली या संताचा जन्म झाला. तो अडाणी, अशिक्षित. त्यामुळे जन्म कधी झाला. याची नोंद नाही. त्याच्या अडाणी असण्याचे कारणही तसेच. या गावात शाळाच नव्हती. या गावात पहिली शाळा सन २००० साली सुरू झाली.
कोणतेही शालेय शिक्षण नसल्यामुळे, अगदी लहानपणापासूनच तो व्यवसायाकडे वळला आणि फळविक्रेता झाला. त्याने संसार थाटला. अगदी सुखाचा.
सारे काही सुरळीत सुरू होते आणि एक दिवस एक अशी घटना घडली की, त्या घटनेने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. एक विदेशी जोडपे त्याच्याकडे संत्री खरेदीसाठी आले. त्यांनी संत्र्यांची किंमत विचारली. पण खूप प्रयत्नांनंतरही, त्या जोडप्याला किंमत समजावून सांगण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे ते जोडपे संत्री खरेदी न करताच निघून गेले. ‘ते विदेशी जोडपे बोलत असलेली भाषा आपल्याला समजली नाही, म्हणून आपण त्यांना संत्री विकण्यात अपयशी ठरलो’ हे समजण्याइतपत तो शहाणा होता. हा प्रसंग अतिशय छोटा आणि साधा, पण या प्रसंगाने त्याच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.
त्याने मनोमन विचार केला, “आपण अडाणी असल्यामुळे ह्या जोडप्याला फळ विकण्यात अयशस्वी ठरलो. आपल्या गावात अशी कितीतरी मुलं आहेत, जी अशिक्षित आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज आहे. आज मी अडाणी असल्यामुळे माझी ही अवस्था झाली. उद्या त्या मुलांवरही अशीच वेळ येऊ शकते. जे आपल्या वाट्याला आले, ते त्या मुलांच्या वाट्याला येवू नये. यासाठी त्यांना शिक्षण मिळणे. गरजेचे आहे. यासाठी मला काहीतरी केले पाहिजे. या विचाराने त्याने गावात शाळा स्थापन करण्याचा निर्धार केला. गावातील लोकांना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि खूप प्रयत्नानंतर सन २००० साली गावातल्या मशिदीत पहिली प्राथमिक शाळा सुरू करण्यात तो यशस्वी झाला. (आपल्या भारत देशाची हीच मोठी शोकांतिका आहे. येथे मंदिराचे कळस उंचच्या उंच आहेत आणि शाळांचे छप्पर मात्र गळके. स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्ष होऊनही गावात शाळा नाहीत, पण धार्मिक स्थळं मात्र आहेत.)
शाळा सुरू झाल्यानंतर स्वच्छता करणे आणि मुलांना पिण्याचे पाणी उकळून ठेवणे ही कामे तो नित्यनियमाने करू लागला. आपल्या मिळकतीतील मोठा हिस्सा तो शाळेसाठी नियमित द्यायचा. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. तेव्हा जागेची अडचण निर्माण होऊ लागली. पण हातावर पोट असलेल्या त्या संत्री विक्रेत्याचा निश्चय दृढ असल्याने तो डगमगला नाही. कर्ज काढून त्याने शाळेसाठी जमीन खरेदी केली. वर्गखोल्या बांधल्या. यासाठी त्याला समाजाची, सामाजिक संस्थांची मदत झाली. त्याच्या अथक प्रयत्नांनी २००८ साली गावात शासकीय माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली.
समाजासाठी तो खूप मोठं काम करत होता. स्वतः अशिक्षित, अडाणी असून देखील इतरांचे जीवन सुखावह व्हावे. यासाठी तो एखाद्या संत महात्म्याप्रमाणे झटत होता. म्हणूनच लोकांनी त्याला “अक्षर संत” ही उपाधी दिली. या “अक्षर संता”चे समाजासाठीचे कार्य पाहून भारत सरकारने २०२० सालचा ‘पद्मश्री’ हा मानाचा किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे आणि हे “अक्षर संत” म्हणजेच हरेकला हजब्बा होय.
बंगळुरूपासून ३५० किलोमीटर अंतरावर स्थित न्यू पाडपू गावात पोहचण्यासाठी साधे रस्तेही नाहीत. परंतु, हजब्बा यांनी उभारलेल्या इथल्या शाळेत जवळपास १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
१५० रुपये एवढी तुटपुंजी कमाई असताना देखील, त्यांनी पाहिलेलं स्वप्नं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम यामुळेच शाळा निर्मितीचे त्यांचे स्वप्नं पूर्ण होऊ शकले. हजब्बा यांच्या जीवन प्रवासातून एक बोध मिळतो की, “माणसाचा विचार मोठा असला पाहिजे आणि त्या विचाराला कृतीची जोड असली पाहिजे. तरच स्वप्नं सत्यात येऊ शकतात. हजब्बा यांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळावी. म्हणून मंगलोर विद्यापीठामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित पाठ शिकवला जातो. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू.
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
https://naviarthkranti.org/
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti