कोणता व्यवसाय करायचा? हा प्रश्न विचारणारे लोक भरपूर आहेत. भरपूर म्हणजे इतके की, हा प्रश्न विचारणार नाही असा व्यवसाय करू इच्छिणारा तरूण सापडणार नाही. या प्रश्नाने मला अगदी जंग जंग पछाडले आहे. बरं याची समाधानकारक उत्तरे देऊन मी अगदी हताश झालो तरी जे प्रश्न विचारणारे आहेत. त्यांना त्याचे समर्पक उत्तर ऐकायचे नाही. त्यांना त्यांच्या मनाला सुखावणारे उत्तर हवे असते.
सगळ्यात जास्त चालणारा, कमीत कमी किंमतीत सुरू होऊ शकणारा, प्रचंड ग्राहक असणारा व्यवसाय प्रत्येकालाच करायचा असतो. सर्वांपेक्षा वेगळा व्यवसाय करण्याचे भूत अनेकांच्या डोक्यात बसलेले आहे. परंतु व्यवसायातील काही न समजणारे धोके आहेत. सुरुवातीला तर ते धोके वाटत नाहीत, मात्र पुढे जाऊन आपण या धोक्यांची शिकार होण्याची शक्यता आहे.
कीटकभक्षी वनस्पती दिसायला अतिशय सुंदर असतात. त्यांची फुले इतकी सुंदर असतात की, त्याच्या मोहात पडण्याचा निर्णय कीटकांसाठी जीवघेणा ठरतो. या वनस्पतींची फुले पाहिल्यावर ती प्रत्येकालाच आकर्षित करत असतात. हरणे, ससे यासारखे प्राणी पकडण्यासाठी शिकारी सापळे लावतात. या जाळ्यात आपसूक व अलगद अडकल्यावर बाहेर पडणे या प्राण्यांना शक्य होत नाही. व्यवसायातसुध्दा काही वेळा आपल्याला फायदा होईल असे वाटणाऱ्या गोष्टींचा धोका आपल्या लक्षात येत नाही.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधी जाणून घेऊया. तुमच्या मध्ये किती टॅलेंट (प्रतिभा) आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही नेहमीच करता. हे करायला काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला तुमच्या प्रतिभेचा कधीच पूर्ण अंदाज लागू देऊ नका, कारण हे लोक तुमच्या मर्यादा लक्षात आल्यावर तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतील.
जगभरातील अनेक सर्वेक्षणातून हे समोर आलेले आहे की; ज्या लोकांमध्ये खूप मोठी झेप घेण्याची क्षमता आहे हे जेव्हा प्रस्थापितांच्या लक्षात येते, तेव्हा ते अशा क्षमतावान माणसाला मोठे होऊ देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. आपल्यापेक्षा पुढे जाणारा माणूस सहजासहजी कुणालाच खपत नाही. मत्सर हा अतिशय भयंकर रोग आहे. तो शत्रूपेक्षा जास्त जवळच्या माणसांकडून अनुभवायला मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा इतरांहून मोठे होण्याचा प्रयत्न करत आहात, तेव्हा तुमच्यापासून कोणताही धोका होणार नाही असा विश्वास तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला देण्याचा प्रयत्न करा. शिवाय तुम्ही स्वतःला सिध्द कराल, तेव्हा त्या लोकांचा फायदा होईल याची खात्रीसुध्दा त्यांना द्या.
श्रेय घेणे – केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला प्रत्येकाला आवडते, मात्र जेव्हा केव्हा आपण स्वतः केलेल्या कामाचे श्रेय आपण घेतो हे सुध्दा काहीजणांना रूचत नाही. तेव्हा आपण केलेल्या कामात अनेक भागीदार आहेत हे भासवण्याचा प्रयत्न करा. श्रेय दिल्याने तुम्ही मोठे होत असता. म्हणून जमेल तेवढ्या जास्त गोष्टींचे श्रेय त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ते लोक खूश होतील व अधिक गुणवत्तापूर्ण काम करण्याचा प्रयत्न करतील. याउलट तुम्ही जर स्वतःला श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर हे लोक नाराज होतील. कामात कसर करतील. त्याशिवाय तुमचे महत्त्व कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. श्रेय दिले की यातील अनेक प्रश्न सहज सुटून जातील.
एकदा अब्दुल कलाम यांच्या जीवनात एसएलव्हीचे उड्डाण अयशस्वी झाले. तेव्हा निराश झालेली शास्त्रज्ञ मंडळी बसलेली असताना काही पत्रकार आले. यावेळी त्या ग्रुपचे लीडर डॉक्टर सतीश धवन यांनी स्वतः अपयशाची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली व त्या पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. पुन्हा काही दिवसांनी एसएलव्हीचे उड्डाण यशस्वी झाले, तेव्हा सतीश धवन यांनी पत्रकार परिषदेला जाण्याचे टाळले व सर्व शास्त्रज्ञांना पत्रकारांसमोर पाठवले. पुढे या शास्त्रज्ञांनी खूप चांगली कामगिरी करून दाखवली. कारण त्यांना माहिती झाले होते की, आपले नेतृत्त्व करणारे सतीश धवन पराभवाची जबाबदारी स्वतः घेतात व विजयाचे श्रेय टीमला देतात.
श्रेय सगळ्यांना द्या. अपयशाची जबाबदारी स्वतःवर घ्या. त्यामुळे दुनियेच्या नजरेत तुम्ही कदाचित थोडी कमी प्रसिध्दी मिळेल. मात्र जे लोक तुम्हाला उभे करणार आहेत, त्यांचा विश्वास कायम तुमच्या सोबत राहील. श्रेय घेण्याचा धोका पत्करू नका. अपयशाचे खापर इतरांवर फोडण्याची चूक करू नका.
– अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती〰️〰️〰️〰️〰️व्यवसायाच्या वाटेवर चालताना या पुस्तकाच्या नोंदणीसाठी –
https://imojo.in/VVCH
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti