एकेकाळी आपल्या मुलाशी संघर्ष कराव्या लागलेल्या एका अडाणी महिला शेतकऱ्याचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग…
ओडिशा राज्यातील कोरापुट जिल्ह्यातील एका आदिवासीबहुल गावात अडाणी कमलाचा जन्म. तिचा विवाह पात्रपूट या गावात झाला. शेती हा गावातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय. विशेषतः भात हेच आदिवासींचे मुख्य पीक.
पात्रपूट या गावात लग्न करून आल्यानंतर तिला एक गोष्ट जाणवली की, या गावातील लोक दोन ते तीन प्रकारच्या वेगवेगळ्या देशी वाणांचे उत्पादन घेत आहेत. पिकाच्या कापणीनंतर ते आपसात बियाण्यांची देवाणघेवाण करायचे. त्यामुळे, या गावात मोठ्या प्रमाणावर देशी वाणांची उपलब्धता असायची. पण काही वर्षानंतर ही परिस्थिती बदलली. गावातील शेतकरी नव्या कमी दर्जाच्या, पण अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असल्यामुळे देशी वाणांच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचे तिच्या लक्षात आले. शिवाय देशी वाणांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे तिच्या लक्षात आले.
देशी वाणांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे, तिने मनाशी पक्के ठरवले आणि तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. पात्रपूट गावाच्या २० किलोमीटर परिघात असणाऱ्या वाड्यावस्त्यांवर जाऊन, पायी फिरून शोध घेत कमलाने वेगवेगळ्या जातीच्या देशी वाणांचे संकलन करायला सुरुवात केली. खराब रस्ते, डोंगरदऱ्या, जंगल आदी पायी प्रवास करून तिने वाणांचे संकलन केले. गोळा केलेलं बी ती आपल्या घरी साठवून ठेवत असे किंवा आपल्या दोन एकर शेतातील छोट्याश्या जागेवर पेरत असे. या कामात तिच्या मुलाच्या विरोधाला तिला तोंड द्यावे लागले. पण तरीही आपले काम नेटाने पुढे नेत, कमलाने १०० हून अधिक देशी वाणांचे संवर्धन आणि संरक्षण केले आहे. सोबत पारंपरिक शेतीचा प्रसारही केला आहे. कमलाच्या या कामाची दखल घेत ओडिसा सरकारने तिला ‘सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ती ‘सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी’ म्हणजेच ‘कमला पुजारी’ होय.
कमला पुजारी यांचे काम हे एक दोन वर्षांचे नाही. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची चार दशकं खर्ची घातली आहेत. शेकडो मैलांचा पायी प्रवास करून, अनेक वाड्यावस्त्या पालथ्या घालून त्यांनी शेकडो देशी वाणांचे संकलन केले आहे. त्याचे संवर्धन केले आहे. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी आपले काम थांबविले नाही. आपण एखादं मोठं काम करत असलो की, कालांतराने त्याला होणारा विरोध आपोआप गळून पडतो. कमला पुजारी यांनी देखील हेच केलं. त्यामुळं मुलाचा विरोध गळून पडला.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥
गीतेतील या श्लोकानुरुप कमला पुजारी कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता काम करत राहिल्या. त्यांच्या कामाचे फळ म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार दिला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti