नॅचरल आईस्क्रीम ही सर्वाधिक आवडीची आईस्क्रीम म्हणून पहिली जाते. या आईस्क्रीमच्या मागे दडलीय एक थक्क करणारी प्रेरणादायी कहाणी… कर्नाटकमधील मंगलोर जिल्ह्यातील पतूर तालुक्यातील मुलकी या गावातील रघुनंदन श्रीनिवास कामथ हा एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा.
महिन्याला 100 रुपये कमावून त्यात 7 मुलांची कशी तरी गुजराण ते करत होते. रघुनंदनने अत्यंत हलाखीत दिवस काढले. 15व्या वर्षी सर्व कामथ कुटुंब कर्नाटक वरून मुंबईला स्थलांतरीत झाले. मुंबईला जुहू कोळीवाड्यातील एका 12 by 12 च्या खोलीमध्ये सर्व कुटुंब राहायचे. रघुनंदन हा घरातील सर्वात लहान सदस्य असल्याने त्याला कॉटखाली झोपावे लागायचे.
वयाच्या 15 वर्षी मुंबईत सुरुवातीला रघुनंदन यांनी चप्पल विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ जो त्यांच्याहून २० वर्षांनी मोठा, त्याचा उसळ पावचा व्यवसाय होता. त्यातून त्याने व्यवसाय वाढवून गोकुळ रिफ्रेशमेन्टमार्फत साऊथ इंडियन फूड आणि घरगुती आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला.
रघुनंदन कामथ भावाच्या व्यवसायात भावाला मदत करायचे. त्यातून त्यांनी पाहिले की लोकांना आईस्क्रीम जास्त आवडते व ती आवडली तर दुसऱ्यांसोबत शेअर करतात. यातून त्यांना कल्पना सुचली की ग्राहकांना फळांचे तुकडे असणारी, नैसर्गिक फळांपासून बनवलेली आईस्क्रीम कृत्रिम फ्लेवरच्या आईस्क्रीमपेक्षा जास्त आवडेल.
त्यांनी ही आपली कल्पना आपल्या घरच्यांना सांगितली, पण कोणीच ती मनावर घेतली नाही. पण रघुनंदन कामथ एका योग्य वेळेची वाट पाहून होते. काही दिवसांनी त्यांच्या पारिवारिक संपत्तीची वाटणी करण्याची वेळ आली, तेव्हा इतर भावांप्रमाणे त्यांनी मासिक स्वरूपात रक्कम स्वीकारण्याऐवजी एकदम एक लाख रुपयांची रक्कम घेतली.
नवीन लग्न झालेल्या रघुनंदन कामथ यांना जाणवले की मुंबईसारख्या शहरात एक लाख रुपयाच्या बीज भांडवलावर व्यवसाय करणे शक्य नाही. याप्रसंगी त्यांची पत्नी अन्नपूर्णा यांनी त्यांना हिम्मत दिली प्रोत्साहन दिले. नातेवाईक आणि मित्रांकडून 3 लाख रुपये जमा करून १९८४साली ते आईस्क्रिमच्या व्यवसायात उतरले.
जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम (जेवीपीडीएस) इथे नॅचरल आईस्क्रीम या नावाने ३५०स्केअर फूट जागेत पहिले शॉप सुरू केले. सुरुवातीला रघुनंदन व त्यांची पत्नी यांच्यासह चार कर्मचारी होते. सुरुवातीला 15 किलो आईस्क्रीम 10 फ्लेवरमध्ये बनवली. ज्याचे एका आठवड्यात १ हजार कप विकले गेले. रघुनंदन सायकलवरून जाऊन ग्राहक जोडण्यासाठी पायपीट करत असत. त्यात ते प्रसिद्ध व्यक्तींकडे जाऊन त्यांना आईस्क्रीम वितरित करायचे. यातून बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींना जोडले. 2 वर्षात त्यांनी 14 लाखांचा व्यवसाय केला.
तिथून त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. त्यांची आईस्क्रीम पर्यटकांच्या पसंतीला उतरली. आईस्क्रीमसाठी लागणारे दूध ते मुंबईतील दर्जेदार दूध समजल्या जाणाऱ्या नोबल डेरीचे दूध घेतात, तर साखर ही दर्जेदार फार्मा ग्रेडची घेतात. वडील फळ विक्रेते असल्याने फळांचे पारखी आहेत. आईस्क्रीमसाठी अत्यंत दर्जेदार गोष्टी घेण्याबाबत त्यांचा पूर्वीपासून कटाक्ष आहे.
आज नॅचरल आईस्क्रीमचे देशभरात १५०हुन अधिक आऊटलेट आहेत. तर ६० फळांपासून 100 हन अधिक फ्लेवरची आईस्क्रीम उत्पादित करतात. आज कंपनीचे 3000 हजार कोटींचे एकून मूल्य आहे. चारकोप कांदिवली वेस्टला त्यांची स्वतःची आईस्क्रीम फॅक्टरी आहे. रोज 20 टन आईस्क्रीम बनवली जाते व पॅक करून देशभरात वितरित केली जाते.
तर हा होता, एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटींची उलाढाल असलेल्या नॅचरल आईस्क्रीमचे मालक रघुनंदन कामत यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास. आवडल्यास अवश्य शेअर करा.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti