भारत सरकारने ‘वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व’ (SSR) धोरणाचा मसुदा तयार केला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) याच्या धर्तीवर या प्रकाराचे धोरण तयार करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरणार आहे. देशातल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञान संस्था तसेच स्वतः शास्त्रज्ञांना विज्ञानाच्या प्रसाराच्या कार्यात सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
विज्ञानाला समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी असा पुढाकार घेतला जात आहे. प्रस्तावित धोरणाच्या अंतर्गत – शास्त्रज्ञ किंवा तज्ञ लोक समाजाला त्यांच्याकडचे ज्ञान देण्याकरीता व्यक्तीशाः दरवर्षी कमीतकमी 10 दिवस समाजासाठी समर्पित करण्याची गरज आहे. हे आवश्यक अर्थसंकल्पीय समर्थनाने पोहोच नसलेल्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता ओळखते. तज्ञ लोक / शास्त्रज्ञांना त्यांच्या वार्षिक कामगिरीचे मूल्यांकनाच्या आधारे SSR अंतर्गत चालू असलेल्या त्यांच्या वैयक्तिक क्रियाकलापांसाठी वित्तपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. कोणत्याही संस्थेस त्यांच्या SSR अंतर्गत चालणारे उपक्रम आणि प्रकल्पांसाठी बाहेरून मदत घेण्याची परवानगी नाही.
देशात SSR धोरण लागू करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागात (DST) एका केंद्रीय मंडळाची स्थापना केली जाणार. अन्य मंत्रालयांनाही त्यांच्या आदेशाखाली SSR धोरण लागू करण्याविषयीची स्वतःची योजना तयार करण्यास प्रोत्साहित केले जाणार. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ विकसित केले जाणार, ज्यामधून वैज्ञानिकदृष्ट्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या सामाजिक गरजांची पूर्तता करणे तसेच उपक्रमांची प्रगती व कार्यांची नोंद ठेवली जाणार. हे धोरण पूर्वीच्या धोरणांच्या (जसे की वैज्ञानिक धोरण ठराव-1958, तंत्रज्ञान धोरण विधान-1983, विज्ञान व तंत्रज्ञान धोरण-2003, आणि विज्ञान तंत्रज्ञान व नवकल्पना धोरण-2013) परंपरेनुसार बनविले गेले आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti