भारतातील एक व्यक्ती अशी आहे ज्याला ट्री मॅन म्हणून ओळखलं जातं. सध्या ८४ वय असलेल्या या व्यक्तीने आतापर्यंत एक कोटींहून अधिक झाडे लावली आहेत. ध्येयाने झपाटलेल्या, त्यासाठी तीन एकर जमीन विकणाऱ्या, लोकांनी वेडा संबोधलेल्या एका ध्येयवेड्या इसमाचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग…
तेलंगणातील खमाम जिल्ह्यातील रेड्डीपल्ली या गावात रमैया चा जन्म झाला. लहान मुलं अनुकरणशील असतात. आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक चांगल्या वाईट सवयींचे अनुकरण करत असतात. लहानपणापासूनच रमैया आपल्या आईच्या प्रत्येक कामाचे बारकाईने निरीक्षण करायचा.
त्याची आई झाडं लावायची. बीज संग्रह करायची. रोपं तयार करून ती लावायची आणि त्याचे संवर्धन करायची. बऱ्याचवेळा झाडे लावण्यासाठी, बीज शोधण्यासाठी रमैयास ती सोबत घेवून जायची. त्यामुळे रमैयाला देखील झाडे लावण्याचे, त्याचे संवर्धन करण्याचे प्रचंड वेड लागले. त्याला ती सवयच लागली. शाळेत जात असलेल्या रमैयाला आईसोबत बीज गोळा करणे, झाडे लावणे हे त्याचे आवडीचे छंद जोपासता येत नव्हते. त्यामुळे तो बेचैन व्हायचा. शिवाय, शाळेत शिक्षकांनी झाडांचे महत्त्व समजून सांगितल्यानंतर झाडे लावण्याची त्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. त्याने मनोमन आयुष्यभर झाडे लावण्याचा संकल्प केला. आपला संकल्प सिद्धीस नेण्यासाठी दहावीतून त्याने शाळाच सोडली.
रोपं शोधणं, ती लावणं, त्याचं संवर्धन करणं, बीज संग्रह करणं हा त्याचा नित्याचा दिनक्रम बनला. सायकलवर विविध प्रकारची रोपे घेवून, गावाबाहेर जायचा, मोकळी जागा दिसली की, त्याठिकाणी रोपं लावायचा. त्याचा हा दिनक्रम पाहून लोकं त्यांच्यावर हसायची. त्याला वेडा म्हणून हिणवायची. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करून, तो गतीने पुढे जायचा. तो आज इतका पुढे गेला की, त्याने आजवर एक करोडहून अधिक झाडे लावली आहेत. म्हणूनच त्याचा गौरव “The Tree Man Of India” असा केला जातो. तो ट्री मॅन म्हणजेच “दरिपल्ली रमैया” होय.
पर्यावरणप्रेमी असलेले दरिपल्ली रमैया हे झाडांची स्वतः काळजी घेतात. एखादं झाड वाळलं, तर त्यांच्या मनाला वाईट वाटतं. आपलीच लहान मुलं असल्यासारखं ते झाडांना सांभाळतात. झाडांबद्दल त्यांनी इतकी माहिती मिळवली आहे की, आतापर्यंत त्यांनी ६०० हून अधिक प्रकारच्या बिया आहेत. त्यांच्याकडे शिकलेल्या लोकांपेक्षाही याबाबतची माहिती जास्त आहे.
आपल्या ध्येयपूर्तीसाठी ध्येयवेड्या रमैया यांनी तीन एकर जमीन विकली आहे. रमैया यांच्या कार्याची दखल घेऊन “ॲकॅडमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस”ने “डॉक्टरेट” ही मानाची पदवी दिली आहे. शिवाय भारत सरकारने त्यांना २०१७साली पद्मश्री हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे.
असं म्हणतात, ‘वेडी माणसं इतिहास घडवितात आणि शहाणी माणसं ती वाचतात, तर जास्त शहाणी माणसं त्याचा अभ्यास करतात. ‘पण इतिहास घडवायला वेडं व्हावं लागतं, तो शहाण्याचा घास नव्हे. कारण इतिहास घडवायला लागणारं शौर्य, धाडस, धोका पत्करण्याची क्षमता ही फक्त वेड्या माणसातच असू शकते. रमैया यांच्याकडे ते शौर्य, ते धाडस आणि धोका पत्करण्याची क्षमता होती, म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
https://naviarthkranti.org/
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti