सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिलेल्या एका हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्याला, कुटुंबाच्या अचानक बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावे लागले. त्याच तरुणाच्या नावावर आज १०० हून अधिक पेटंट आहेत. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत…
७ एप्रिल १९६२ रोजी आसाम राज्यातील लखीमपुर येथे एका व्यापार्याच्या घरी उद्धबचा जन्म झाला. तो इतका हुशार आणि बुद्धिमान की, त्याला सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिला गेला. आठवीत असतानाच अकरावी आणि बारावीचे अवघड प्रश्न सहज सोडवायचा. त्याच्या जिज्ञासू वृत्तीने त्याला अनेकदा वर्गाच्या बाहेर उभे राहण्याची शिक्षा मिळाली.
शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण वडिलांच्या व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे, त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा निर्माण झाला. बँकेने त्यांना तात्काळ घर खाली करण्यासाठी नोटीस पाठवली. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेणे निव्वळ अशक्य झाले होते. त्यामुळेच त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याचा मोठा आघात सहन करून त्याने नोकरीला सुरुवात केली.
माणूस कितीही मोठ्या संकटात असला तरी, त्यातून बाहेर पडण्याची एक संधी त्याच्या समोर येतेच, फक्त ती संधी शोधण्याची नजर पाहिजे. एक पॉलिथिन बनवणारे, ६ लाख रुपये किंमतीचे विदेशी यंत्र, कमी पैशात बनविण्याचे आव्हान उद्धबच्या समोर ठेवण्यात आले. “प्रत्येक संकटात एक आव्हान असते आणि प्रत्येक आव्हानात एक संधी असते.” नेमकं हेच त्याने हेरलं. आपल्या बुद्धीचा अन् कौशल्याचा वापर करून मिळालेल्या आव्हानाचा सामना करून, त्या विदेशी यंत्राची, अगदी जशीच्या तशी भारतीय कॉपी बनवली. तेही केवळ ६७ हजार रुपयांमध्ये. या आव्हानामुळे उद्धबला आपल्यातील क्षमतेचा नव्याने शोध लागला. अनेक लोकांनी पाय ओढण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याला भीक न घालता त्याने आपले संपूर्ण लक्ष संशोधनावर केंद्रित केले. २०१२ साली त्याने बनवलेल्या एका यंत्रासाठी नासाने एक्सेप्शनल टेक्नॉलॉजी ॲचिवमेंट ॲवार्डने त्याला सन्मानित केले. तो जगप्रसिद्ध भारतीय संशोधक म्हणजेच डॉ. उद्धब भराली होय.
डॉ. उद्धब भराली यांच्यासमोर परिस्थितीने मोठे संकट मोठे आव्हान उभे केले. पण आलेल्या आव्हानात सुद्धा त्यांनी संधी शोधली. यामुळेच त्यांना आपल्यातील क्षमतेचा शोध लागला. म्हणूनच त्यांच्याकडे १००हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीची दखल घेवून भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
१९९० आणि २००० या दहा वर्षांत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४ पेक्षा जास्त मशीन तयार करण्यात आल्या. त्यांनी शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसाठी यंत्रे तयार केली. २००६ मध्ये, त्यांची डाळिंब सीडिंग मशीनसाठी त्यांची रचना केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अशा प्रकारचा पहिला शोध म्हणून ओळखली गेली. याशिवाय उद्धब भराली यांनी रेमी रिसायकलिंग मशीन, लसूण डोलणारे, नारळ डोलणारे, सफेद मुसली डोलणारे यंत्र, तंबाकू पान कटर, बांबू प्रोसेसिंग मशीन, ऊस सोलणारे यंत्र, ज्यूस एक्स्ट्रॅक्टर असे आतापर्यंत १५९ हून अधिक शोध लावले आहेत. त्यांच्या या शोधांमुळे त्यांना भारताचे मशीन मॅन म्हणून संबोधले जाते. यापैकी बरीचशी यंत्रं भारतीय बनावटीची, अत्यंत स्वस्त आणि एकट्याने वापरता येण्याजोगी आहेत.
आज जगात अनेक ठिकाणी कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. अनेकजण आपल्या घरात बंद आहेत. या आव्हानाच्या काळात आपण आपल्यातील क्षमतेचा शोध घेतला पाहिजे. धावपळीच्या युगात अशी वेळ, अशी संधी परत कधी मिळेल हे सांगता येत नाही. म्हणूनच आहे त्या आव्हानात संधी शोधण्याचा प्रयत्न करा.
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
https://naviarthkranti.org/
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti